

200 नव्हे, तब्बल एक हजार कोटींचा घोटाळ्याची शक्यता ? – पुरवठा विभागाची दैना उघडकीस”
तीन नावे, एक आरोपी – अफरातफर प्रकरणात गूढ वाढतचं चाललंय! धाराशिव – सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी वेब सिरीजेसना मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र धाराशिव जिल्हा पुरवठा विभागात सध्या जे काही सुरू आहे, त्यापुढे ही सिरीजेस फिकी वाटाव्यात अशी स्थिती आहे. गरीबांसाठी असलेलं रेशनचं धान्य काळ्या बाजारात विकून प्रचंड पैसा कमावणं, शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि वेगवेगळ्या नावांच्या…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सहा मोटरसायकल जप्त, एक आरोपी अटकेत, एक फरार
धाराशिव जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंडा, तुळजापूर, कळंब आणि शिराढोण परिसरातून चोरलेल्या एकूण सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे. या कारवाईत फारुक तांबोळी या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेला आणखी एक साथीदार सध्या फरार…

रानडुकराचा थरकाप! 63 वर्षीय शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; हाताची दोन बोटं तुटली.
धाराशिव – कळंब तालुक्यातील माळकरांजा येथे रान डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य धोक्यात आले आहे. येथील शेतकरी आगतराव दत्तात्रय लोमटे हे 63 वर्षीय शेतकरी शेतात शेळ्या राखत असताना अचानक एका भल्या मोठ्या रानडुकराने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. ही घटना इतकी भयानक होती की तब्बल एक तास लोमटे आणि त्या रानडुकरामध्ये झटापट चालली. या झटापटीत त्यांच्या उजव्या…

पुरवठा विभागातील अनागोंदी: आरोपीच्या नावाचा गोंधळ आणि राष्ट्रीयत्वाचा प्रश्न – घुसखोरीचा संशय?
धाराशिव – २०० कोटींच्या घोटाळ्यात अडकलेल्या पुरवठा विभागात मोठी अनागोंदी समोर आली आहे. ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफर प्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. फूड कॉर्पोरेशनच्या स्लिपवर त्याचे नाव “सलीम अलीम शेख” तर ट्रान्सपोर्ट पासवर “अलीम शेख” असे आढळते. मात्र, पोलिस चौकशीत आरोपी स्वतःचे नाव “अखिल शेख” असल्याचे सांगत आहे. या गोंधळामुळे आरोपीचा…

ओमप्रकाश शेटे यांची “आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र” समितीच्या अध्यक्षपदी निवड
धाराशिव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ओमप्रकाश शेटे यांची “आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र” समितीच्या अध्यक्षपदी विशेष दर्जा व सुविधेसह निवड करण्यात आली आहे. “No File, Only Life” या ध्येयाने प्रेरित होऊन, आरोग्यसेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही…
गौतमीचा दादा !
गौतमीने “I love you” म्हणताच ७० फूट उंच झाडावरचा दादा खाली उतरला .
धाराशिव- जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे ग्रामदैवत नृसिंह यात्रेनिमित्त गुढी पाडव्याच्या दिवशी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी झाली. मात्र, या कार्यक्रमात एक अनोखा प्रसंग घडला, ज्याची चर्चा संपूर्ण गावभर रंगली आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या एका तरुणाने चक्क ७० फूट उंच झाडावर चढून…
तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर उभारली गुढी; भक्तांच्या उपस्थितीत हिंदू नववर्षाचे स्वागत
धाराशिव – तुळजाभवानी मंदिरात प्रत्येक सण पारंपरिक उत्साहात साजरा केला जातो. होळी आणि रंगपंचमीच्या उत्सवानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या निमित्ताने आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास मंदिराच्या मुख्य कळसाखाली विधिवत गुढी उभारण्यात आली. या शुभप्रसंगी मंदिरातील महंत आणि पुजारी उपस्थित होते. गुढी उभारल्यानंतर देवीचा…
धाराशिव जिल्ह्यात राशन तांदूळ वाहतुकीसाठी नागपूरच्या कानडेची ट्रॅक?
राशन चोरट्यांवर जिल्हा पुरवठा विभाग मेहेरबान धाराशिव – धान्य वितरण व्यवस्थेमधून जिल्हा पुरवठा विभागाने 200 कोटींपेक्षा अधिक घोटाळा केला असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. लातूर येथील गोडाऊन येथून धाराशिव येथे पाठवण्यात आलेल्या तांदूळ प्रशासनाचा मेहरबानीवर चोरण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरवठा विभागाकडून जुजबी कारवाई करत संबंधित ट्रॅक चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र वास्तविक…

तुळजाभवानी मातेच्या दरबारातील यात्रा मैदान तत्कालीन नगरसेवकाच्या घश्यात?
तुळजापूर शहरातील महिला यात्रा मैदान नगरसेवकाच्या घशातून सोडवण्यासाठी करणार आंदोलन भूखंड हडपणारा तो कोण? सरकारी अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष, भूमाफियांचा सुळसुळाट! तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या आसपासचा भूभाग हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून, तो भाविकांसाठीच राखीव असायला हवा. मात्र, सध्या या परिसरात भू-माफियांनी आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांनी संगनमत करून जमिनीवर अतिक्रमण केल्याची गंभीर बाब समोर आली आहे….

मार्च आला की धास्ती! अखर्चित निधी वाचवण्यासाठी जिल्हा परिषदेत गडबडगोंधळ – नागरिक मात्र बेफिकीर!
धाराशिव – मार्च महिना सुरू होताच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना अखर्चित निधीच्या खर्चाची इतकी धास्ती वाटू लागली की, चक्क सुट्टीच्या दिवशीही सर्व प्रमुख कार्यालये उघडी ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले. वर्षभर निधी वापरण्यात दिरंगाई करणारे अधिकारी आता शेवटच्या क्षणी गडबडगोंधळ करताना दिसत आहेत. गेलं वर्षभर काय केलं? – सामान्य नागरिकांचा सवाल…
- 1
- 2